Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

पैशांचा व्यवहार
पैशांचा व्यवहार
पैशांचा व्यवहार
Ebook235 pages55 minutes

पैशांचा व्यवहार

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

सुखी व चांगले जीवन जगण्यासाठी पैसा हा आपल्या जीवनाचा अतिशय महत्त्वपूर्ण भाग आहे. परंतु आपण कधी असा विचार केला आहे की एखाद्याकडे पुष्कळ पैसे असतात, तर एखाद्याकडे बिलकूल नसतात, असे का? परम पूज्य दादाश्रींना नेहमीच वाटायचे की पैशांच्या व्यवहारात नैतिकता असणे अत्यंत गरजेचे आहे. स्वत:च्या अनुभावातून आणि ज्ञानाच्या मदतीने ते पैशांचे येणे-जाणे, फायदा-तोटा, देणेघेणे इत्यादी बाबतीत सविस्तरपणे जाणत होते. ते म्हणायचे की मनाच्या शांती आणि समाधानासाठी कुठल्याही व्यापारात खरेपणा आणि प्रामाणिकते सोबत नैतिक मूल्य असणे अत्यंत गरजेचे आहे. ज नसल्यामुळे, जरी आपल्याकडे पुष्कळ धन असले तरी आत सदैव चिंता व व्याकुळता वाटत राहते. आपल्या वाणीद्वारे दादाश्रींनी पैशांच्या बाबतीत होणार्या संघर्षातून कसे मुक्त व्हावे आणि समाधानपूर्वक व प्रामाणिकपणे आपला पैशा संबंधित व्यवहार कसा पूर्ण करावा याचे सुंदर वर्णन केले आहे जे आपण या पुस्तकात वाचू शकाल.

Languageमराठी
Release dateFeb 6, 2019
ISBN9789386321763
पैशांचा व्यवहार

Read more from दादा भगवान

Related to पैशांचा व्यवहार

Related ebooks

Reviews for पैशांचा व्यवहार

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    पैशांचा व्यवहार - दादा भगवान

    www.dadabhagwan.org

    दादा भगवान कथित

    पैशांचा व्यवहार

    मुळ गुजराती संकलन : डॉ. नीरूबेन अमीन

    अनुवाद : महात्मागण

    दादा भगवान कोण?

    जून १९५८ संध्याकाळची अंदाजे सहाची वेळ, सुरत स्टेशनावर अलोट गर्दी होती. प्लेटफार्म नंबर तीनच्या रेल्वेच्या बाकावर बसलेले श्री. अंबालाल मूळजीभाई पटेल रुपी देहमंदिरात नैसर्गिक स्वरूपात कित्येक जन्मापासून व्यक्त होण्यासाठी आतूर असलेले ‘दादा भगवान’ संपूर्णपणे प्रगट झाले आणि निसर्गाने सर्जन केले अध्यात्माचे अद्भूत आश्चर्य! एक तासात विश्वदर्शन लाभले! आपण कोण? भगवान कोण? जग कोण चालवत आहे? कर्म म्हणजे काय? मुक्ति कशाला म्हणतात? इत्यादि जगातील सर्व आध्यात्मिक प्रश्नांचे संपूर्ण निराकरण केले! आणि जगातील सर्व अध्यात्मिक प्रश्नांचा संपूर्ण उलगडा झाला. अशाप्रकारे निसर्गाने विश्वला प्रदान केले एक अद्वितीय, पूर्ण दर्शन आणि ह्याचे माध्यम बनले अंबालाल मूळजीभाई पटेल, जे होते गुजरातचे चरोतर जिल्ह्यातील भादरण गावचे पाटील, कंट्राक्टचा व्यवसाय करणारे आणि तरी ही पूर्ण वीतराग पुरुष.

    त्यांना ज्ञान प्राप्ति झाली त्याच प्रमााणे ते फक्त दोन तासात इतर मुमुक्षुनां सुद्धा आत्मज्ञान प्राप्ति करून देत होते, त्यांच्या सिद्ध झालेल्या अद्भूत ज्ञान प्रयोग द्वारा. त्याला अक्रम (क्रमविरहीत) मार्ग म्हणतात. अक्रम म्हणजे क्रमाशिवायचा आणि क्रम म्हणजे पायरी पायरीने, क्रमाक्रमाने वर चढण्याचे ! अक्रम म्हणजे लिफ्ट मार्ग ! शॉर्ट कट!!

    ते स्वत: प्रत्येकाला ‘दादा भगवान कोण?’ ह्याबदलची फोड करून सांगताना म्हणायचे कि, ‘हे दिसतात ते ‘दादा भगवान’ नाहीत। हे तर ए.एम. पटेल आहे. आम्ही ज्ञानी पुरुष आहोत आणि आत प्रगट झाले आहेत ते दादा भगवान आहेत। ते चौदलोकचे नाथ आहेत, ते तुमच्यात पण आहेत, सर्वांमध्ये आहेत! तुमच्यात अव्यक्त रुपात बसलेले आहेत आणि ‘इथे’ संपूर्णपणे व्यक्त झालेले आहेत! मी स्वत: परमेश्वर नाही। माझ्या आत प्रगट झालेले ‘दादा भगवान’ त्यांना मी पण नमस्कार करतो.’

    व्यापारात धर्म असावा परंतु धर्मात व्यापार नसावा. ह्या सिद्धांताने ते संपूर्ण जीवन जगले. त्यांनी जीवनात कधीही कोणाकडून ही पैसे घेतले नाहीत, उलट स्वत:चा व्यवसायातून झालेल्या फायद्यातून भक्तांना यात्रा करवीत असत.

    आत्मज्ञान प्राप्तिची प्रत्यक्ष लिंक

    मी तर, काही लोकांना माझ्या हातून सिद्धि प्रदान करणार आहे. नंतर कोणीतरी हवा की नको! नंतर लोकांना मार्ग तर हवाच ना?

    ~ दादाश्री

    परम पूज्य दादाश्री गावो-गावी, देश-विदेशी परिभ्रमण करुन मुमुक्षुंना सत्संग आणि आत्मज्ञान प्राप्ती करवीत होते. दादाश्रींनी आपल्या हयातीतच पूज्य डॉ. नीरुबहन अमीन (नीरुमा) यांना आत्मज्ञान प्राप्त करवून देण्याची ज्ञानसिद्धी प्रदान केली होती. दादाश्रींच्या देहविलयानंतर नीरुमा त्यांच्याप्रमाणेच मुमुक्षुंना सत्संग व आत्मज्ञाप्राप्ती निमित्त भावाने करवित असत. पूज्य दीपकभाई देसाई यांना दादाश्रींनी सत्संग करण्याची सिद्धी प्रदान केली होती. पू. नीरुमांच्या उपस्थितीतच त्यांच्याच आशीर्वादाने पूज्य दीपकभाई देश-विदेशात कित्येक ठिकाणी जाऊन मुमुक्षुंना आत्मज्ञान प्राप्ती करवून देत होते, हे कार्य नीरुमांच्या देहविलयानंतर आजसुद्धा चालूच आहे. या आत्मज्ञान प्राप्तीनंतर हजारो मुमुक्षु या संसारात राहून, सर्व जबाबदा:या संभाळत असताना सुद्धा मुक्त राहून आत्मरणतेचा अनुभव घेत आहेत.

    पुस्तकात मुद्रित वाणी मोक्षार्थीला मार्गदर्शनासाठी अत्यंत उपयोगी सिद्ध होईल, परंतु मोक्षप्रप्तिसाठी आत्मज्ञान प्राप्त करणे गरजेचे आहे. अक्रम मार्गाने आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग आजसुद्धा चालू (मोकळा) आहे. जसा प्रज्वलित दिवाच दुस:या दिव्याला प्रज्वलीत करु शकतो, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष आत्मज्ञानींकडून आत्मज्ञान प्राप्त करुनच स्वत:चा आत्मा जागृत होऊ शकतो.

    निवेदन

    परम पूज्य ‘दादा भगवान’ यांच्या प्रश्नोत्तरी सत्संगात विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना त्यांच्या श्रीमुखातून अध्यात्म आणि व्यवहार ज्ञानासंबंधी जी वाणी निघाली, ती रेकॉर्ड करून, संकलन व संपादन करून पुस्तकांच्या रुपात प्रकाशित केली जात आहे. त्याच साक्षात सरस्वतीचे अद्भूत संकलन ह्या पुस्तकात झाले आहे, जे आम्हा सर्वांसाठी वरदानरुप ठरेल.

    प्रस्तुत अनुवादाची वाक्यरचना मराठी व्याकरणाच्या मापदण्डा वर कदाचित खरी ठरणार नाही, परंतु दादाश्रींची गुजराती वाणीचे शब्दश: मराठी अनुवाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे, की जेणे करुन वाचकांना असा अनुभव व्हावा की दादाजींचीच वाणी ऐकली जात आहे. पण तरीसुद्धा दादाश्रींच्या आत्मज्ञानाचे अचूक आशय, जसे आहे तसे तर तुम्हाला गुजराती भाषेतच अवगत होईल. ज्यांना ज्ञानाचा गहन अर्थ समजून घ्यायचा असेल, ज्ञानाचा खरा मर्म जाणायचा असेल, त्यांनी या हेतूने गुजराती भाषा शिकावी अशी आमची नम्र विनंती आहे.

    अनुवादातील त्रृटींसाठी आपली क्षमा प्रार्थीतो.

    वाचकांना...

    1. ह्या पुस्तकातील मुद्रित पाठ्यसामग्री मूळत: ‘त्रिमंत्र’ या गुजराती पुस्तकाचे मराठी अनुवाद आहे.

    2. जिथे जिथे ‘चंदुभाऊ’ ह्या नावाचा उल्लेख केला आहे, तिथे वाचकांनी स्वत:चे नाव समजून वाचन करावे.

    3. पुस्तकातील कोणतीही गोष्ट जर तुम्हाला समजली नाही, तर प्रत्यक्ष सत्संगात येऊन त्याचे समाधान मिळवावे अशी नम्र विनंती.

    4. दादाश्रींच्या श्री मुखातूत निघालेले काही गुजराती शब्द जसे च्या तसे ‘इटालिक्स’ मध्ये ठेवले आहेत, कारण त्या शब्दांसाठी मराठीमध्ये तसेच कोणतेही शब्द उपलब्ध नाहीत की ज्यामुळे त्याचा अर्थ पूर्णपणे समजता येईल. पण तरीही त्या शब्दाचे समानार्थी शब्द () कंसात लिहिलेले आहेत.

    संपादकीय

    ‘बिनहक्काचे विषयभोग नरकात घेऊन जातात,’

    ‘बिनहक्काची लक्ष्मी तिर्यंचगतित(पशूयोनित)घेऊन जाते’

    ~दादाश्री

    संस्कारी घराण्यात बिनहक्काच्या विषयासंबंधीची जागृती ब:याच ठिकाणी दिसते परंतु बिनहक्काच्या लक्ष्मीसंबंधीची जागृती दिसून येणे खूप कठिण आहे. हक्काची आणि बिनहक्काची लक्ष्मी यांची सीमारेषाच सापडत नाही, तेही ह्या भयंकर कलियुगात!

    परम ज्ञानी दादाश्रींनी त्यांच्या स्याद्वाद देशनेत आत्मधर्माच्या सर्वोत्तम टोकाचे सर्व स्पष्टीकरण केलेले आहे, इतकेच नव्हे, तर व्यवहार धर्माचे सुद्धा तितक्याच उच्च दर्जाचे स्पष्टीकरण दिले आहे. ज्यामुळे निश्चय आणि व्यवहार या दोन्ही समांतर पंखांनी मोक्षमार्गात झेप घेणे शक्य होते! आणि ह्या काळात व्यवहारात सर्वात विशेष प्राधान्य दिले गेले असेल तर ते केवळ पैशालाच! आणि हा पैशांचा व्यवहार जोपर्यंत आदर्शपणे होत नाही, तोपर्यंत व्यवहार शुद्धी शक्य नाही. आणि ज्याचा व्यवहार बिघडला त्याचा निश्चय बिघडल्याशिवाय राहणारच नाही! त्यासाठी ह्या काळाला अनुरुप पैशांच्या संपूर्ण दोषरहित आदर्श व्यवहाराचे सुंदर विश्लेषण दादाश्रींनी केले आहे. आणि असा दोषरहित आणि आदर्श लक्ष्मीचा (पैशांचा) व्यवहार दादाश्रींच्या जीवनात पाहायला मिळाला, तो या महा महा पुण्यवंतांना!

    धर्मात, व्यापारात, गृहस्थजीवनात लक्ष्मी संबंधी स्वत: प्रामाणिक राहून दादाश्रींनी जगाला एक आश्चर्यजनक आदर्श दाखविला आहे. दादाश्रींचे सूत्र होते ‘व्यापारात धर्म असावा परंतु धर्मात व्यापार नसावा.’ धर्म आणि व्यापार या दोन्हींमध्ये आदर्शाची सांगड दर्शविली आहे! दादाश्रींनी स्वत:च्या खाजगी जीवनात स्वखर्चासाठी कधीही कुणाचा एक पैसा सुद्धा स्वीकारला नव्हता. उलट स्वत:चे पैसे खर्च करून गावोगावी सत्संग देण्यासाठी जात असत, मग तो प्रवास ट्रेनने असो किंवा प्लेनने! करोडो रुपये, सोन्याचे दागिने वगैरे भक्तजनांनी त्यांच्या पुढे ठेवले पण दादाश्रींनी कधीही त्याचा स्वीकार केला नाही. दान करण्याची ज्यांची खूपच प्रबळ इच्छा असेल अशा व्यक्तींना लक्ष्मी सन्मार्गी, मंदिरात किंवा लोकांसाठी अन्नदानात वापरण्यास सुचवत असत. आणि ते सुद्धा त्या व्यक्तिच्या ऐपतीची खाजगी माहिती त्याच्याकडून तसेच त्याच्या कुटुंबियांकडून विस्तारपूर्वक मिळवून, त्यात सर्वांची राजीखुशीने सहमती आहे, हे कळल्यानंतरच त्यांना ‘होकार’ देत असत!

    संसार व्यवहारात पूर्णपणे आदर्शपूर्वक राहणारा, संपूर्ण वीतराग पुरुष आजवर या जगात पाहण्यात आला नव्हता, असा पुरुष या काळात जगाला पाहावयास मिळाला. त्यांची वीतराग वाणी जगाला सहजतेने प्राप्त झाली. जीवन व्यवहारात उदर निर्वाहासाठी लक्ष्मीची प्राप्ती अनिवार्य आहे, मग ती नोकरी करून असो किंवा धंदा-व्यवसाय करून असो किंवा अन्य कोणत्याही प्रकारे असो, पण या कलियुगातही व्यवसाय करीत असताना सुद्धा वीतरागांच्या मार्गाने कसे चालता येईल, याचा अचूक मार्ग दादाश्रीनीं स्वत:च्या अनुभवाच्या योगे जगापुढे प्रस्तुत केला. लोकांनी कधी पाहिले तर सोडा, पण कधी ऐकलेही नसेल, अशा ‘अतुलनीय’ भागीदाराचा ‘रोल’ स्वत:च्या जीवन व्यवहाराद्वारे जगाला दर्शविला. आदर्श शब्द सुद्धा तिथे फार छोटा वाटतो. कारण ‘आदर्श’ हे तर सामान्य माणसाने आपल्या अनुभवाने ठरवलेली वस्तू आहे. जेव्हा दादाश्रींचे जीवन तर अपवादरुपी आश्चर्य आहे.

    व्यापार करत असताना लहान वयापासून, वयाच्या बावीसाव्या वर्षापासून ज्यांच्यासोबत भागीदारीचा धंदा सुरु केला तो त्यांनी शेवटपर्यंत त्यांच्या मुलांसोबत सुद्धा आदर्शपणे निभावला. कॉन्ट्रॅक्टच्या व्यवसायात लाखो रुपये कमावले, पण त्यांचा असा नियम होता की स्वत: जर नॉन मॅट्रीकच्या डिग्रीने नोकरी केली तर किती पगार मिळेल? तर पाचशे किंवा सहाशे. म्हणून तितकेच रुपये घरात आणायचे, बाकीचे पैसे धंद्यातच राहू द्यायचे, जेणेकरून नुकसान प्रसंगी कामी यावे! आणि आयुष्यभर हा नियम त्यांनी अचूकपणे पाळला! भागीदाराच्या मुला-मुलींच्या लग्न प्रसंगी सुद्धा होणारा खर्च त्यांनी फिफ्टी-फिफ्टी (निम्मा) पार्टनरशीपमध्ये केला! अशी आदर्श भागीदारी जगात कुठेही पाहायला मिळेल का?

    दादाश्रींनी व्यवसाय आदर्शपणे, अतुल्यपणे केला, पण तरीसुद्धा त्यांचे चित्त तर सदैव आत्मा प्राप्त करण्यातच होते. १९५८ मध्ये आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा कित्येक वर्षे व्यवसाय चालू राहिला. पण स्वत: आत्म्यात राहून, मन-वचन-काया, जगाला आत्मा प्राप्त करवून देण्यासाठी गावोगावी, जगाच्या कानाकोप:यात प्रवास करण्यात घालविले. अशी कोणती अलौकिक दृष्टी प्राप्त झाली की जीवनात व्यापार-व्यवहार आणि अध्यात्म दोन्ही एकाचवेळी सिद्धीच्या शिखरावर राहून शक्य झाले?

    लोकसंज्ञेत लक्ष्मीलाच प्राधान्य आहे, पैशालाच अकरावा प्राण म्हटले आहे, असा प्राण समान पैशांचा व्यवहार जो आपल्या जीवनात घडत आहे, त्या संबंधात देण्या-घेण्याचे, फायदा-तोट्याचे, या जन्मात लक्ष्मी टिकण्याचे आणि पुढील जन्मी सोबत घेऊन जाण्याचे, जे मार्मिक सिद्धांत आहेत, तसेच लक्ष्मीच्या स्पर्शाचे जे नियम आहेत, ते सर्व, ज्ञान दृष्टीने पाहून आणि व्यवहारात अनुभवून दादाश्रींच्या वाणीद्वारे जी विस्तारीत माहिती प्राप्त झाली, तो हा ‘पैशांचा व्यवहार’ सूज्ञ वाचकांना

    Enjoying the preview?
    Page 1 of 1