Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

जे अज्ञानी असतात
जे अज्ञानी असतात
जे अज्ञानी असतात
Ebook325 pages2 hours

जे अज्ञानी असतात

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

ह्या उत्कृष्ट पुस्तकात, बिशप डाग हेवार्द- मिल्स शिकवतात की प्रामाणिकपणाचा घटक कोणत्या अर्थाने एका पुढार्याची कर्तबगारी ह्यालात एकजूट करतो. पवित्र शास्त्रीय, ऐतिहासिक आणि साहित्यिक संदर्भ वापरून, प्रत्येक प्रकारच्या वाचकासाठी हा विषय अधिक प्रसंगोचित करण्यात आला आहे.

Languageमराठी
Release dateJun 20, 2018
ISBN9781641354448
जे अज्ञानी असतात
Author

Dag Heward-Mills

Bishop Dag Heward-Mills is a medical doctor by profession and the founder of the United Denominations Originating from the Lighthouse Group of Churches (UD-OLGC). The UD-OLGC comprises over three thousand churches pastored by seasoned ministers, groomed and trained in-house. Bishop Dag Heward-Mills oversees this charismatic group of denominations, which operates in over 90 different countries in Africa, Asia, Europe, the Caribbean, Australia, and North and South America. With a ministry spanning over thirty years, Dag Heward-Mills has authored several books with bestsellers including ‘The Art of Leadership’, ‘Loyalty and Disloyalty’, and ‘The Mega Church’. He is considered to be the largest publishing author in Africa, having had his books translated into over 52 languages with more than 40 million copies in print.

Related to जे अज्ञानी असतात

Related ebooks

Reviews for जे अज्ञानी असतात

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    जे अज्ञानी असतात - Dag Heward-Mills

    अनुक्रमणिका

    अज्ञानता आणि अप्रामाणिकपणा

    प्रामाणिकपणाचे दहा कायदे

    प्रामाणिकपणाचेपाच नियम

    प्रामाणिकपणाचीसहा तत्वे

    अप्रामाणिकपणाची तीन कारणे

    अप्रामाणिकपणाचा समय

    अप्रामाणिकपणाची सहा प्रदर्शने

    ख्रिस्ताचा प्रामाणिकपणा

    पित्याचा प्रामाणिकपणा

    प्रामाणिकपणाच्या तीन परीक्षा

    प्रामाणिकपणाचेप्रतिफळ

    अप्रामाणिकपणा हाताळण्याच्या सात पद्धती

    अध्याय १

    अज्ञानता आणि अप्रामाणिकपणा

    कोणी तसे समजत नसल्यास न समजो.

    १ करिंथकरास पत्र १४:३८

    प्रामाणिकपणा आणि अप्रामाणिकपणा ह्याविषयी शिकण्यासाठी खूप काही आहे. अजून खूप काही शिकण्यासाठी असते तरीही काही लोक अज्ञानी राहण्याची निवड करतात. ह्या पुस्तकात तत्वे, नियमशास्त्रे , नियम आणि वास्तव आहेत जे प्रामाणिकपणा आणि अप्रामाणिकपणा ह्यांच्या संकल्पनेवर अधिकार गाजवतात. अप्रामाणिकपणा हे अनेकदा अज्ञानता, अपरिपक्वता आणि शिक्षणाचा अभाव ह्यांचे फळ असते. अशिक्षित लोक बरेचदा बंडखोरी आणि अप्रामाणिकता ह्यासाठी साजेसे असतात कारण ते काय करतात ह्याचे अवलंबन त्यांना कळत नाही. ह्या पुस्तकाच्या शिकवणीने, अज्ञानता तुमचे जीवन आणि सेवाकार्य ह्यासाठी जे गैरफायदे आणत त्यावर विजयी होता.

    मला माहित आहे त्यापेक्षा अनेक मंडळया अप्रामाणिकतेच्या कामाने नष्ट होतात! माझ्या सेवेच्या पहिल्या वर्षात मला ते कळले. माझ्या अननुभवी सेवाकार्यात कट रचणे, दोषारोप, चुका काढणे, चोरी , निंदा ह्याच्याद्वारे एक सैतानी हल्ला ह्याचा अनुभव घेतला. त्या काळात मी जेवढा गोंधळ बघितला तेवढा मी कधीच बघितला नाही.

    सेवेत खूप पूर्वी, मी हे तात्पर्य काढले की अप्रामाणिकता आणि त्याच्याशी संबंधित दुष्टाई ह्या सैतानाच्या शस्त्रसामग्रीत अत्यंत घातकी शस्त्रे आहेत.

    बर्याच ख्रिस्ती लोकांना वाटते की सैतानाचे उत्तम शस्त्र हे पाखंड, जादूटोणा, आणि वुडू ह्याच्याद्वारे कार्यरत होतात.मी सहमत आहे की ह्या गोष्टी म्हणजे सैतानाच्या शस्त्रागारात हे शस्त्रे असतात.

    पण लोकांनी हे जाणून घ्यावे की सैतानाचे सर्वात मोठे प्रसार म्हणजे फसवणुकीच्या क्षेत्रात आहे. सैतान जर तुम्हाला फसवू शकला तर, तो तुमचा नाश करणारच! सैतान अनेक लोकांना विश्वास ठेवण्यास भाग पाडतो की न्याय आणि सत्य ह्यांच्या नावाने देवाच्या सेव्काशी ते लढत आहेत. तरीही, खूप वेदनेने त्यांना जाणीव होते की ते काटे कुसळे ह्यांच्या विरुद्ध पाय आपटतात.

    मंडळीच्या विरुद्ध जेव्हा तो लढला आणि त्यातील एक पुढारी, स्टेफन ह्याला काढून टाकण्यावर जेव्हा त्याने निरीक्षण केले तेव्हा पौलाला हे कळले. शौल चांगल्या विवेकाचा मनुष्य होता. त्याला वाटले की तो यरुशलेमाच्या शांतीप्रिय शहरातून त्रास देणाऱ्या लोकांना काढत होता. नितीमत्वाच्या ह्या लढाईत, समाजासाठी जे घटक धोकादायक असे होते त्यांना काढून टाकण्याचा त्याने प्रयत्न केला. खोटे उपदेशक आणि सेवक ह्यांना उघड करण्यासाठी ते एका पवित्र युद्धात आहेत असा विचार करणारे अनेक लोक आहेत. शौलासारखे, व्यासपीठावरील जे ढोंगी लोक आहेत त्यांच्याविषयी सत्य सर्वांना कालवून घेण्याची त्यांची दैवी आज्ञा आहे असे त्यांना वाटते. प्रेषित पौल इतका आश्चर्यचकित झाला की ख्रीस्ताच्याविरुद्ध तो खरेतर लढत होता.

    मग जाता जाता असे झाले की, तो दिमिष्काजवळ येऊन पोहचला त्या वेळी अकस्मात त्याच्यासभोवती आकाशातून प्रकाश चमकला. तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की, शौला, शौला, माझा छळ का करतोस?तेव्हा तो म्हणाला, प्रभो, तू कोण आहेस? त्याने म्हटले, ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे; [काट्यावर लाथ मारणे हे तुला कठीण. तेव्हा तो थरथर कापत व आश्‍चर्यचकित होऊन म्हणाला प्रभो, मी काय करावे अशी तुझी इच्छा आहे? प्रभू म्हणाला,] तर ऊठ व नगरात जा, म्हणजे तू काय करायचे हे तुला सांगण्यात येईल."

    प्रेषित ९:३-६

    पौलाला जेव्हा तो काय करत होता हे कळले तेव्हा तो खूप थक्क झाला. जेव्हा लोकांना ते काय करत आहेत हे लकात नाही, तेव्हा ते बरेचदा चुकीची गोष्ट करतात! पौल नंतर म्हणतो की तो जे काही करत होता हे माहित नसल्यामुळे त्यासाठी त्याला देवाची दया मिळाली.

    कारण मी जो पूर्वी निंदक, छळ करणारा व जुलमी होतो त्या मला त्याने विश्वासू मानून आपल्या सेवेकरता ठेवले; मी असा होतो तरी मी जे केले ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून माझ्यावर दया झाली;

    १ तीमथी १:१३

    विश्वासू, प्रामाणिक, स्थिर आणि सातत्याने राहण्याची अक्षमता ही सेवाकार्ये संपवून टाकणारे कारण असते. तो व्यापारांना सर्वाधिक ठार करतो. एक छोटा, जलद आणि सोपा मार्ग असण्याची भावना सर्व लोकांमध्ये असते. सैतान त्या मानसिकतेवर अधिक दृढ होत राहतो.

    अनेक क्ज्रीसी लोक बंडखोर लोकांच्या आणि असे दृष्टांतवादी लोकांच्यामागे जाण्यामध्ये भुलवले जातात. अनेक लोक अज्ञान असल्यामुळे ह्या गोष्टी करतात. जुलूमशाही मंडळीच्या पुढार्यांचे उदाहरण सैतान घेऊन मंडळीत बंडखोरी आणि अप्रामाणिकता ह्यांची संस्कृती उत्पन्न करतो. ते न जनता, अनेक मंडळीचे पुढारी अजूनही बंडखोर आणि अप्रामाणिक आहेत. ते ज्या गोष्टी बोलतात आणि करतात ह्यामुळे त्यांच्या अनुयायांना बंडखोरी शिकवतात. कोणीही त्यांच्याविरुद्ध बंडखोरी किंवा अप्रामाणिकता दर्शवली तेव्हा त्यांना ते काही कळत नाही. तुम्ही पहा, फसवणूक इतकी बलिष्ठ गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही फसवले जाता तेव्हा पांढरे हे काळे आणि काळे पांढरे आहे ह्याबाबत तुमची फसगत होते.

    अप्रामाणिकतेचा दृष्टांत

    रिक जोयनर ह्यांच्या ‘’द फायनल क्वेस्ट’’ ह्या पुस्तकात प्रभूने त्यांना जे प्रगटीकरण दिले त्यामुळे माझ्यामध्ये खूप जिज्ञासा होती. त्यांनी एका मोठ्या सैतानी सैन्याचे वर्णन केले जी मंडळीच्या विरोधात येत होते. ह्या सैतानी सैन्याचे मुख्य ध्येय म्हणजे नात्याच्या पत्येक स्तरावर फुट पाडणे हे होते: मंडळी आणि इतर मंडळया, मंडळी आणि त्यांचे पाळक आणि पती व पत्नी.

    प्रगटीकरणाचा दुसरा उल्लेखनीय पैलू म्हणजे हे सैतानी सैन्य जी शस्त्रे जवळ बाळगत होते. मी तर हे बघितले की जी शस्त्रे त्यांच्याजवळ होती त्यालाच ‘विश्वासघात’ असे म्हंटले जात होते. विश्वासघात म्हणजे अप्रामाणिकतेचे सर्वात उच्च प्रतीचे स्वरूप आहे हे तुम्हाला माहित आहे का?हे समजून घेणे रुचकर आहे की केवळ एकाच भाल्याला नाव दिले गेले आणि त्याला विश्वासघात म्हंटले! प्रिय मित्रा, माझा विश्वास आहे की सैतानाचा मंडळीच्या विरुद्ध मुख्य भाला म्हणजे अप्रामाणिकता आणि विश्वासघात आहे.

    मी ह्यावर जसा विचार केला, अनेक मंडळया ह्याच्यात मुख्य पराभव पाहिले, त्यांनी ह्या गोष्टी अप्रामाणिकपणा आणि विश्वासघात ह्यामुळे सहन केल्या. मी अनेक देवाच्या सेवकांचा विचार केला ज्यांच्यासाठी सन्मान दाखवण्यासाठी मी वाढलो आणि त्यांचे सेवाकार्य कसे खुन्तीत झाले ह्यावर मी विचार केला. अप्रामाणिकता ह्याची ह्या घटनांमध्ये मुख्य भूमिका बजावली.

    ह्या दृष्टांतात चार बाणांचा उल्लेख होता: दोषारोप, चहाड्या, निंदा, आणि चुका काढणे. वरवर, हे चारही शस्त्रे खूप प्रभावी दिसत नाही. सैतान वापरू शकणारे देखिल हे शस्त्रे वाटत नाहीत. तरीही, काही वर्ष सेवेत असताना देखील मी हे तात्पर्य काढले की सैतानाच सर्वात प्रभावी शस्त्रे म्हणजे ह्याच गोष्टी असतात. पहिल्यांदा बघितल्यावर, अनेक अनुभव नसलेले लोक ह्यांना अल्प समस्या म्हणून रद्द करतात.

    माझी खात्री आहे की अनेक लोकांनी ह्या बाणांना शुल्लक गोष्टी म्हणून लेखले आहे ज्या प्रत्येक सेवकाने हाताळल्या पाहिजेत. सैतानाला माहित आहे की दोषारोप त्या दोषी व्यक्तीला दुर्बल, गोंधळात टाकून त्यांना अपंग करतात. दोषी व्यक्ती कितीही निष्पाप असो, त्याच्यावर एकदा दोष लावला की तो गोंधळात पडतोच. तो स्वतःला विचारतो, ‘’ कोणी अशा गोष्टीवर कसा विचार करेल?’’ दोषारोप इतके शक्तिशाली असतात, की काही काळाने, निष्पाप लोक देखील त्या दोषारोपाशी सहमत होऊ लागतात. दोषारोप त्या दोषी व्यक्तीला अपंग करतात. एकदा तसे झाल्यावर, सर्व लोक अकार्यशील बनतात. जसे ते दोषारोप पसरतात, जिकडे ते विष पसरवले गेले त्या लोकांच्याभोवती ही व्यक्ती फिरू देखील शकत नाही. निंदा, चहाडी आणि चुका काढणे हे सर्व दोष काढण्याचे प्रकार आहेत. ह्या गोष्टी मंडळीला दुर्बळ, अपंग करतात आणि गोंधळात पडतात. हा गोंधळ मंडळीत आणि बाहेर देखील पसरतो. दोषी व्यक्ती आणि ऐकणारे लोक देखील तसे गोंधळात पडतात. बरेच लोक ह्या गोंधळावर विजय मिळवत नाही. काही लोकांना ते प्राप्त करून घेता येत नाही आणि सेवेत ते तसेच राहू शकत नाही. शत्रूचे हे अत्यंत शक्तिशाली हत्यार आहे! जेव्हा दोषी व्यक्तीला तुम्ही हाताळता तेव्हा पवित्र शास्त्र सांगते की मंडळी सबळ होते.जोपर्यंत तुम्ही दोषी व्यक्तीची वाणी ऐकता, तुम्ही काही स्वरूपात तसे दुर्बल बनता.

    तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली; ती म्हणाली, "आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार हे प्रकट झाले आहेत; कारण आमच्या बंधूंना दोष देणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा, खाली टाकण्यात आला आहे.

    प्रगटीकरण १२:१०

    देवाच्या सेवकांच्या विरुद्ध असे अथक दोषारोप का केले जातात ह्याची तुम्ही कधी कल्पना केली का? मोठ्या शहरात एका पाळकाने ज्यांनी असे संस्थापकीय कार्य केले त्याची मला आठवण होते. त्यांच्या द्वारे, अनेक लोकांचे तारण झाले आणि इतर सेवकांना प्रशिक्षण मिळाले. शहर सोडून जाण्यापर्यंत त्यांच्यावर निंदा करून त्यांच्यावर दोष लावले गेले. त्यांच्या चक इतक्या मोठ्या केल्या गेल्या की त्यांच्याबद्दल काहिच चांगले बोलले गेले नाही. शेवटी, तो शहर सोडून गेला आणि सेवाकार्य त्याने बाजूला ठेवले. सैतानाची कार्य करण्याची पद्धत खूप सोपी आहे- त्यांच्यावर इतके दोष लावत राहा की त्यांचा आत्मविश्वास पूर्णपणे गमावला जाईल! त्यांच्यावर इतके दोष लावा की समाजात त्यांच्याबद्दल कोणीच चांगले बोलणार नाही. ते काय करत आहेत तसे करण्यापासून त्यांना थांबवा.

    तसेही, निघून गेल्यावर बरेच वर्षाच्यानंतर, त्याला ज्या लोकांना त्याने आशीर्वादित केले होते त्यांनी परत आमंत्रण देऊन सन्मानीत केले. त्याच्या सेवेचे फळ जेव्हा त्याने पाहिले तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटले असेल असा माझा विश्वास आहे. दोष लावणारा आणि ताचे दूत ह्याच्या अथक प्रहाराला त्याने तोंड दिले नाही. ह्याच्या नंतर लगेच तो सेवेला परत गेला हे म्हणण्यास मला खूप आनंद होतो.

    ह्या पुस्तकात दुसरे अद्भुत प्रगटीकरण होते ते म्हणजे भुते ख्रिस्ती लोकांवर चालत होते घोड्यांवर नाही. दुसऱ्या शब्दात, अजाणतेपणे सैतान ख्रिस्ती लोकांना वापरून घेत होता!

    मला एक पाळक ठाऊक आहेत जे ख्रिस्ताचे शरीर विघटीत करण्यात अत्यंत चांगले आहेत. मागील पंधरा वर्षात त्याचे सेवाकार्य मी बघितले आणि मला वाटते की मंडळीत फुट पाडण्यासाठी आणि त्याच्यात ‘’छावण्या किंवा गट’’ पाडण्यासाठी ते खूपच प्रसिद्ध होते. त्यांना माहित देखील नव्हते की त्यांच्या कृती आणि निर्णय ह्यांनी मंडळीत खूपच फुट पाडली. त्याने कोणतेही श्रम न घेता आणि अत्यंत चलाखीने हे केले! ते बोलतात आणि इतके सन्माननीय दिसतात की मंडळीची ते फुट पाडत आहेत असे वाटत नाही. शांत बसून त्यांच्या कृतींवर तुम्ही विचार केल्यावर तुम्हाला कळते की ते कितीतरी धूर्त आहेत.

    रिक जोयनर ह्यांच्या सैतानाच्या सैन्याच्या ह्या दृष्टांतातून मी हा छोटा शास्त्रभाग घेतो. सैतानाच्या सर्व युक्त्या तुम्ही स्पष्टपणे बघू शकाल अशी माझी प्रार्थना आहे.

    "सैंनी सैन्य इतके मोठे होते की मी पाहू शकलो त्याच्यापेक्षा ते खूप दूरवर स्थित होते. त्याची विभागणी अशा गटात झाली, त्यात एक वेगळे फलक होते. सर्वात पुढचे भाग तर गर्व, स्वयं- धार्मिकता, आदर, स्वार्थी ध्येय, अनीतिमान न्याय, मत्सर ह्याच्या अधीन होते. माझ्या दृष्टांताच्या पलीकडे हे दुष्ट वर्गवारी होते, पण नरकाच्या ह्या भयंकर खाईतून हे सर्व खूप शक्तिशाली दिसत होते. ह्या सैन्याचा पुढारी तर स्वतः बंधूंवर दोष लावणारा होता.

    ह्या जमावाने घेतलेली शस्त्रे ह्यांना देखील नाव दिले गेले. त्या तलवारींना भयभीत होणे; भाल्यांना विश्वासघात; आणि बनना दोषारोप, चहाडी, निंदा आणि चुका काढणे असे नाव दिले जात होते. छोटे सैतानी गाते ह्यांना नकार, कटुत्व, अधीर बनणे, अक्षमास्वी आणि मोह किंवा वासना हे होते ज्यांना मुख्य हल्ल्यासाठी सैन्याची तयारी होण्यासाठी पुढे पाठवले गेले.

    ह्या छोट्या कंपन्या आणि गट संख्येने खूप लहान होते, पण त्यांच्यापेक्षा मोठ्या संघाने जे काही फुट पाडल्या त्यापेक्षा ते काही कमी नवते. अत्यंत महत्वाच्या कारणांसाठी ते खूपच छोटे होते. जसा बाप्तिस्मा करणारा योहान एकमेव मनुष्य होता, पण अनेक लोकांना प्रभूसाठी तयार होण्यासाठी बाप्तिस्मा देण्यासाठी त्याच्यावर तो अलौकिक अभिषेक होता, ह्या छोट्या भुतांच्या संघांना देखील ‘’लोकांना बाप्तिस्मा देण्यासाठी’’ अत्यंत दुष्ट अधिकार दिले जात होते. कटूत्वाचे एकमेव भूत त्याचे विष अनेक लोकांमध्ये पेरू शकत होते, अगदी त्यात असंख्य प्रजाती किंवा संस्कृती ह्यांचा देखील समावेश होता.वासनेचे भूत स्वतःला एकमेव कर्तबगार व्यक्ती, चित्रपट किंवा जाहिरात ह्यांच्याशी जोडत होता, आणि त्याद्वारे विद्युतप्रवाहाचे झटके देत होता ज्यामुळे अनेक लोक ‘’भावनाशुन्य’’ बनत होते.हे सर्व येणाऱ्या दुष्ट सैन्यासाठी तयारी म्हणून होते.

    हे सैन्य तर विशेषकरून मंडळीच्या विरुद्ध येत होते, पण शक्य तितक्या सर्व लोकांवर ते हल्ला करत होते. मला माहित होते की देवाच्या एका हालचालीला अनेक लोकांना मंडळीत घेऊन येण्यासाठी ते तयार करत होते.

    ह्या सैन्याची मुख्य

    Enjoying the preview?
    Page 1 of 1